सोमवार, 31 अक्टूबर 2022

फॉरेन टूर

 सर्वांनी हि पोस्ट जरूर वाचावी.

      *आयुष्यातील हार*

" मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली.


"साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"


सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.


"मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.


"आतापर्यंत आम्ही भुतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय"


अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.


"पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?" मी विचारलं


" सहपत्नीक! तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही"


" पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही" मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता.


" अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?"


सगळे शांत झाले.


"आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड" पाठक पुढे बोलू लागला "जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला....."


तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले. पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हंणालो.


पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं"

"जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये. या, छान गप्पा मारु"


ते सगळे जेवायला गेले मी मात्र रुमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौ. ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो.


"पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फाँरेन टुर्स, त्याही कमी पगारात!" मी विचारलं.


"सर विशेष काही नाही? आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. टू व्हिलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हाँटेलिंग केलं नाही. हाँटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते"


"याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजाँयमेंट काहीच केली नाही. अहो त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?"


पाठक हसला.


"साहेब एंजाँयमेंटचा अर्थ चमचमीत नाँनव्हेज खाणं, दारु पिणं, चारीत्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरीयल्स पहाणं हा असेल तर तो आम्हांला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पाँझिटिव्ह एंजाँयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? आता राहीला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहीली आहे."


बापरे हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हंटलं "बरं ते जाऊ द्या. मुळ विषयाकडे येऊ या"


"हं तर बचतीबरोबरच अँडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गँरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं"


"पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?"


" मुलं जात्याच हुषार आणि सिन्सियर होती.स्काँलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पुर्ण केली. मला फक्त परिक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत."


"आता काय करतात मुलं?"


"मुलगी साँफ्टवेअर इंजीनियर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते. तिचा नवराही इंजीनियर आहे. दोघांनी कंपनी सुरु केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसीनमध्ये. सध्या एका हाँस्पिटलला प्रँक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हाँस्पिटल उभारायचा विचार करतोय"


मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीला प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं, पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करुन माहेरी निघून येणं सुरुच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता. काँलेजमध्ये असतांना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं. दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. काँलेजमधून काढून मी त्याला बियरबार काढून दिला. आम्हांला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारु पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो.


"आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे" पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझीतंद्री भंगली.


"सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हांला. तोही खर्च आमचा वाचला."


मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पतीपत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजुनही चवळीची शेंग वाटत होती.


"साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!" पाठक बोलला.


"आमचं ठिकच आहे. औरंगाबादला या. तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लँटस् आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियरबार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय" मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.


‌"अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच रहातो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण काहो साहेब एवढी सगळी प्राँपर्टी फक्त पगारावर जमवली? की काही साईड बिझीनेसही आहे तुमचा?"


‌मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करुन कमवलं होतं. दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या क्रुपेने सहीसलामत सुटलो होतो.


‌"अहो पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरीष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?"


‌"साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं. मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की!"

‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?


‌"घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हांला"


‌पाठक निर्मळ हसला. मग म्हणाला.

‌"पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हांलाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल"


‌"हरकत नाही. येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो. गुड नाईट"


‌आम्ही रुमवर परतलो पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. 


खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बी.पी. डायबेटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश... कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकाँकचं साईटसिईंगही एंजॉय करु शकलो ‌नव्हतो.

‌ बँकाँकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

पाठकला इंप्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली.एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता.


‌"या साहेब, या मँडम" पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हाँलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं.भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपाँयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लाँवरपाँटस् होते. शोकेस ट्राँफिजने भरलेलं होतं.


‌"बापरे इतक्या ट्राँफिज!कुणाच्या आहेत या?" माझ्या तोडातून नकळत शब्द निघून गेले.


‌"सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बँडमिंटन स्पर्धेतल्या"


‌"वा छान" मी चांगलाच इंप्रेस झालो.


‌"या साहेब तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी"


‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकुण एक खोली पाठक कुटूंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी व्रुत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं.


‌बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पुर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.


‌"घ्या साहेब" पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भुक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.


‌"वा अप्रतिम!" मी पाठककडे पहात म्हणालो.


‌"साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू आम्ही ठरवला होता"


‌"अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल" मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो.


‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करुन दिल्यावर तो माझ्या आणि सौ. च्या पाया पडला.


‌"हाँस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडिल मदत करणार असतील ना तुला!"

‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.


‌"बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शुन्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून कीती अपेक्षा करायची आम्ही त्याच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर आम्हांला कायमची रुखरुख लागेल आम्हांला की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो."


‌त्याच्या सडतोड पण उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घ्रुणा वाटू लागली.


‌पाठक कुटूंबाचा निरोप घेऊन निघालो. पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटूंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटूंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.


दिवस बदलत गेले. निवडणूका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभुत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती. कारण मी आता नोकरीत नव्हतो.


‌एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर ४-५ सुटाबुटातील माणसं उभी होती.


‌"आम्ही इन्कमटँक्स डिपार्टमेंट कडून आलोय. "त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत दिलं. मी गारठलो, माझे हातपाय थरथर कापू लागले.


‌"मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?" मी कापऱ्या आवाजात विचारलं.


‌" जरुर बोला! त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे"


‌"अहो पण साहेब मी आता रिटायर झालोय."


‌"साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल" तो स्मित करत म्हणाला. 


मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरु होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. 'आता भोगा आपल्या पापाची फळं' अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या.


‌"चला साहेब" झडतीत सापडलेले बेहिशोबी ₹२५ लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला.


‌"कुठे?"


‌"चौकशीसाठी आम्ही तुम्हांला ताब्यात घेत आहोत"


‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. ‌मला अचानक पाठकची आठवण आली.


‌"साहेब एक फोन लावू?" मी विचारलं.


‌"नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स"


‌"साहेब हा माणूस साधा कारकून आहे."


‌"ठिक आहे. स्पिकर आँन करा"


‌मी पाठकला फोन लावला.


‌"हँलो पाठक मी महाजन बोलतोय! पाठक तुम्ही जिंकलात. मी हरलो."


‌"काय झालं साहेब? असं का बोलताय?"


‌"पाठक इन्कमटँक्सची धाड पडली आज बंगल्यावर! मी पकडला गेलो."


‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला.


‌"साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरुर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हांला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद असतो साहेब, काही काळजी करु नका. सगळं व्यवस्थित होईल."


‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल. नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती?साधी सहानुभूती सुध्दा त्यांनी मला दाखवली नव्हती.

‌पाठकच्या रुपात एक खरा *हितचिंतक मला भेटला होता. पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.*


🙏🙏🙏🙏🙏

शनिवार, 1 अक्टूबर 2022

IAS असीमा मित्तल मॅडम

 कामाच्या परिसीमा ओलांडणारी असिमा....


रात्री उशीराने मोबाईलची लाईट चमकली म्हणून मोबाईल हातात घेतला व व्हॉट्स अपवर आलेला मेसेज वाचू लागलो. अनेक मेसेज होते, परंतु त्यातील एकात असिमा मित्तल मॅडम यांची बदली झाल्याचा मेसेज वाचून मन अगदी रितं झालं. काल त्यांचा पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यांचं ते वागणं... शिक्षकांकडून काम करून घेण्याची पद्धत....इथल्या पाड्यांवर काम करण्याची तळमळ...आदिवासी बांधवांच्या शेतीविषयक समस्या समजून घेण्याची उदारता...वेळेच्या बाबतीत असणारा काटेकोरपणा आणि तितकीच विनम्रता असे अनेक गुण मनाला छेडू लागले आणि मग एकंदरीत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहिला.


राजस्थानमधील जयपूर या पिंक सिटीत त्यांचा जन्म 30 जून 1992 रोजी झाला. जयपूरच्या मातीतले संस्कार काल त्यांच्या पिवळ्या रंगाच्या साडीवरून दिसून आले असतीलच. नवरात्रीच्या नऊ रंगांची जादू एकंदरीत त्यांच्याही मनावर असल्याचे त्यातून दिसून आले. 


शालेय जीवनापासूनच असिमा अभ्यासात हुशार होती. परंतु ती फक्त पुस्तकी किडा देखील नव्हती. विविध स्पर्धा असोत वा शालेय खेळ यात भाग घेऊन ती त्यात नेहमी अव्वल येत असे. तिने शालेय जीवनातच अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊन यश मिळवले होते. त्यामुळे आपण कोणतीही परीक्षा दिली तरी त्यात हमखास यश मिळेल असा आत्मविश्वास तिच्या मनात तयार झाला होता.


आपले कष्ट व चिकाटी यांवरील आत्मविश्वासामुळे तिने जेईईचा फॉर्म भरताना फक्त आय आय टी, मुंबई हा एकमेव पर्याय दिला. तिच्या जागेवर दुसरा कोणी असता, तर त्याने नक्कीच 10-20 पर्याय अजून निवडले असते हे मात्र नक्की. परंतु इतिहास घडवणारी माणसं मुळात हटके असतात आणि ते कोणत्याही चौकटीत बसत नाहीत हेच असिमाच्या बाबतीत आपणास दिसून येते.


आय आय टी मुंबईत पदवीचं शिक्षण घेऊन तिने सिव्हील इंजिनिअर ही पदवी तर प्राप्त केलीच सोबत गोल्ड मेडल देखील मिळवले होते.


पदवीचं शिक्षण चांगल्या श्रेणीत पूर्ण केल्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळायला फार उशीर लागला नाही. उत्तम सोयी सुविधा असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी ती आता करू लागली होती. परंतु मन मात्र त्या ऐशोआरामात रमत नव्हतं. असिमा या अशा टिपिकल कामासाठी बनलेली नाही हे तिचं मन तिला सारखं सांगत होतं.


आपलं मन काय सांगतंय हे तिनं ऐकलं व इतक्या मोठ्या पगाराची नोकरी तिने मागचा पुढचा विचार न करता सोडली. वेळ न दवडता तिने युपीएससीच्या अभ्यासाला तिने सुरुवात केली. सिव्हील सर्व्हिसेसची ही परीक्षा फक्त पुस्तकांचा अभ्यास करून किंवा तुम्ही फार हुशार आहात म्हणून पास होता येत नाही याची जाणीव असिमा लवकरच झाली. आज पर्यंत प्रत्येक परीक्षेत अव्वल असणारी असीमा युपएससीच्या पहिल्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरली होती. खरं तर कधीही अपयश न आलेल्या प्रत्येकास हा धक्का पचवणे कठीण गेले असते. तेच असिमाच्या बाबतीत घडले. या काळात ती प्रचंड दडपण व मानसिक तणावातून गेली.यातून बाहेर पडायला तिला बराच काळ गेला. पण ती मागे हटली नाही. ती रडत नाही तर लढत राहिली.....कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांच्या दडपणाशी.


प्रचंड तणावात असताना तिने आपले छंद जोपासले. त्यात मन रमविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच दरम्यान तिला एका सरकारी संस्थेमार्फत राजस्थानमधील एका खेडेगावात भेट देण्याची संधी मिळाली. लोकांशी चर्चा करत... भेटत असताना तिची नजर घरातील एका 3 वर्षांच्या मुलीवर पडली. ती मुलगी जागेवरून हलुही शकत नव्हती. तिच्या आईशी बोलल्यावर असीमाला समजले की ती जन्मापासून अशीच आहे आणि पुरेसे पैसे नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही. समाजातील गरिबी आणि हतबलता याचा अतिशय खोल परिणाम असीच्या मनावर या घटनेमुळे झाला.असीमाची संवेदनशीलता किती प्रामाणिक आहे हे आपणास या घटनेवरून समजून येते. असीमा त्या मुलीच्या वेदनांचा विचार करून अस्वस्थ होत होती. आपण या अशा गरीब व वंचित लोकांसाठी काहीच करू शकत नसल्याची सल तिला सतावत होती. याबाबत ती अनेकदा आपल्या आईशी देखील बोलत होती. या लोकांसाठी काम करायचे असेल तर सिव्हील सर्व्हिसेस शिवाय पर्याय नाही याची जाणीव आईने असीमाला करून दिली होती.


शेवटी असीमाने दुसऱ्यांदा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली व पूर्ण मन लावून जिद्दीने अभ्यास केला. आता फक्त गोल्ड मेडलिस्ट नव्हे तर एक संवेदनशील असीमा सामाजिक भावनेतून प्रयत्न करत होती. शेवटी तिच्या कष्टाचं चीज झालं. यात तिला 328 रँक मिळून आय आर एस (आय टी)मध्ये तिची निवड झाली होती. असीमाला समाजात जाऊन काम करण्याची इच्छा व स्वप्न असल्याने ती या यशाने फार खुश नव्हती. ती सदर पदावर रुजू तर झाली परंतु ती अस्वस्थच होती.


आपली मुलगी इतकी मोठी परीक्षा पास होऊनही खुश नसल्याची जाणीव व्हायला तिच्या वडिलांना फार वेळ लागला नाही. त्यांनी तिच्याशी यावर चर्चा करून पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन तिच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.


आपल्या कुटुंबाचा आपल्यावर असलेला विश्वास व आपल्यातील जिद्द याच्या जोरावर तिला सन 2017 मध्ये इच्छित यश मिळाले. संपूर्ण भारतातून तिचा 12 व्या क्रमांक आल्याने तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. काल पर्यंतची गोल्डन गर्ल असीमा आता IAS असीमा मित्तल मॅडम झाल्या होत्या.


आता तिच्या यशावर लिहिलं जाऊ लागलं होतं. तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात होत्या. परंतु फार काळ ती या प्रसिद्धीच्या झगमगाटात अडकून पडली नाही. 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यावर मी फार काही लिहिणे उचित ठरणार नाही.


असीमा मित्तल मॅडम बोलताना नेहमी सांगतात, " फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. " आज त्यांच्या विचारांची व दृष्टिकोनाची प्रचिती आमच्या डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळांच्या बदललेल्या स्वरूपावरून दिसून येते. 


असीमा मित्तल हा फक्त एक शैक्षणिक प्रवास किंवा कष्टाच्या झाडाला लागलेलं गोड फळ नसून ती एक क्रांती आहे....ती एक विश्वास आहे...आदिवासी मुलांसाठी ती एक आत्मविश्वास आहे....नऊ दुर्गांचं जणू ती एक मानवी रूप आहे.


आज डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळा ज्या पातळीवर पोहचलेल्या आहेत, त्याची कदाचित कोणी कल्पना देखील केली नसेल. जो सकारात्मक बदल इथल्या निस्सीम निसर्गराजीत घडवून आणलाय, तो मित्तल मॅडम यांच्या प्रखर तपश्चर्येचं फळ आहे... त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाचं फलित आहे. 


त्यांची बदली हा विषय काहींसाठी आनंदाचा असेलही...परंतु आश्रमशाळेतील मुलांचा विचार केला, तर त्यांच्यासाठी पोरकं करणारा आहे. 


मित्तल मॅडम यांच्या विचारांचा कस...त्यांनी घालून दिलेली स्वयंशिस्त...सतत नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची लावलेली सवय या गोष्टी जपणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असणार आहे.


त्यांच्या डहाणू येथील प्रवासाचा विचार केला, तर कामाच्या सर्वच परिसीमा ओलांडणारी असीमा असाच आहे...!


असो नुकत्याच झालेल्या झूम मीटिंगमध्ये हाताची स्वच्छता करण्याचा त्यांचा मंत्र मनाच्या स्वच्छतेपर्यंत पोहचेल यात शंकाच नाही. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला वेधचा पुढील प्रवास भविष्यवेधी ठरेल यात शंका नाहीच...


त्यांचा नाशिक येथील जिल्हा परिषदेतील प्रवास असाच आदर्शमय राहो व यातून राष्ट्र निर्माणाचे कार्य त्यांच्या हातून घडो हीच शुभेच्छा...!


- राजू ठोकळ, दाभोण, डहाणू

सोमवार, 10 जनवरी 2022

लसीकरण विरोधात कोर्टात याचिका forwardedpost

 *८० हजार कोटींचा ‘कोरोना व्हॅक्सीन घोटाळा उघड’. लोकांचे जीव धोक्यात घालून त्यांच्या हत्येला व गरीबीला जबाबदार. आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरीत अटक करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल.*


https://rashidkhanvaccineblog.blogspot.com/2021/09/blog-post.html


कोरोना लस बनविणाऱ्या कंपनींना हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी बेकायदेशीर घटनाबाह्य आदेश पारीत करणारे भ्रष्टाचारी मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे उघड करणारे पुरावे, अहवाल व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशांच्या आधारावर आरोपी मंत्री व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून लवकरच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.


त्या याचिकेमध्ये दिलेल्या पुराव्यावरून स्वतःला जनतेचे पुढारी व हितरक्षक असल्याचा बनाव करुन व्हॅक्सीन कंपन्यांकडून हजारो कोटी लाच घेवून फक्त आणी फक्त त्यांच्याच भल्यासाठी काम करुन बेकायदेशीर निर्णय घेवून जनतेला वारेवर सोडून त्यांच्या मृत्यूस व इतर त्रासांना जबाबदार ठरलेले मंत्री व अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले असून जनतेमध्ये भयंकर आक्रोश निर्माण झाला आहे. दोषी मंत्री व अधिकाऱ्यांना त्वरित अटक करुन त्यांनी भ्रष्टाचारने जमविलेली सर्व संपत्ती जप्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.


अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (AIIMS) च्या संचालकांनी दिलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार कोरोना आजारातून बरे झालेली किंवा कोरोनाच्या संपर्कात आलेली लोक ही सर्वात जास्त सुरक्षित असून कोरोना निर्बंधातून त्यांना सर्वात आधी सूट मिळणे आवश्यक आहे. भारतात असे ७०% पेक्षा जास्त लोक आहेत. परंतु त्यांना सुविधा न देता भ्रष्टाचार करून लसीकरण झालेल्या लोकांनाच सुविधा देवून लस कंपनीचा हजारो कोटींचा फायदा करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो शिक्षापात्र भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग या गुन्ह्यामध्ये  मोडतो. अश्या अधिकारी व मंत्र्यांना भा. द. वि. ४०९ मध्ये जन्मठेपेची म्हणजेच आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सदरचा कोरोना लस कंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठी आदेश व निर्बंध काढण्याचा  भ्रष्टाचार हा दरवर्षी लाख कोटींच्या पेक्षा जास्त आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट कायदा ठरवून दिला आहे. [Noida Vs. Noida (2011)6 SCC 527, Vijay Shekhar Vs. Union of India (2004) 4 SCC 666] त्याच कायद्याच्या आधारे महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन दोन अधिकाऱ्यांना सी.बी.आय ,इ.डी यांनी अटक केली आहे. अनिल देशमुख सध्या फरार आहेत. याबाबत इंडियन बार असोसिएशन, अवेकन इंडिया मोव्हमेन्ट आदी संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित  अटक करून प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली सी.बी.आय ,ईडी , एन.आय.ए मार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे.



सविस्तर बातमी


1. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगभरातील शास्त्रज्ञांनी व नॅशनल टास्क फोर्स च्या सदस्यांनी त्यांच्या शोधांमध्ये स्पष्ट केले की कोरोना रोग हा ज्यांना होवून गेला आहे किंवा जो कोणी कोरोना रोगाच्या संपर्कात आला होता त्यांच्या शरीरांमध्ये जी प्रतीकार शक्ती तयार होते ती प्रतीकार शक्ती ही कोरोना लसींमुळे तयार होणाऱ्या प्रतिकार शक्तीपेक्षा शेकडो पटींने जास्त परिणामकारक व प्रभावशाली असते. कारण लसीद्वारे आपण फक्त अप्रभावी विषाणू किंवा तत्सम कृत्रीम रासायनिक पदार्थ शरीरात सोडून शरीराला विषाणू (Virus) सोबत लढण्यासाठी तयारी करतो. हा फक्त युद्धाचा सराव असतो. परंतू ज्या व्यक्तीला कोरोना होवून गेला आहे त्याच्या शरीराने कोरोना विषाणूंशी खरे युद्ध लढून लढाई जिकंलेली असते व त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होण्याची, त्यांच्या जीवाला धोका असण्याची किंवा त्या व्यक्तीद्वारे कोरोना दुसऱ्यांना पसरण्याची शक्यता अजीबात नसते. एखाद्या अपवादात्मक स्थितीला सोडून तो वक्ती सर्वात सुरक्षित मनाला जातो.


2. वरील कारणास्तव कोरोना होऊन बरा झालेला किंवा कोरोनाच्या संपर्कात आलेला व्यक्ती हा सर्वात सुरक्षित मानला जातो. त्याला कोरोनाच्या निर्बंधापासून सूट त्वरीत दिली गेली पाहिजे असे तज्ञांचे मत आहे. कोरोना पासून ठीक झालेल्या व्यक्तींना फ्रान्स सरकारने ग्रीन पास जारी केली आहे. म्हणजेच त्यांना कोरोना निर्बंधातून सूट दिली आहे.


3. नुकतेच देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स च्या समुहाने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण त्वरित थांबविण्याची मागणी केली असून त्यामध्ये लसीचे दुष्परीणाम व नागरिकांमध्ये आता कोरोनाविरोधात नैसर्गिक प्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे इतर सर्व निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.


लिंक: https://awakenindiamovement.com/letter-to-honble-prime-minister/


वेबसाइट: www.awakenindiamovement.com


4. अश्या कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला लस देने म्हणजे त्याच्या शरीराची प्रतीकारशक्ती दुषित करने ठरत असून त्याचे जीवघेणे दुष्परीणाम होऊ शकतात याबाबत जगातील विविध देशांमध्ये शास्त्रज्ञांनी दिलेले अहवाल व भारतातील नॅशनल टास्क फोर्स चे चार महत्त्वपूर्ण सदस्य आणी All India Institute Of Medical Science (AIIMS) चे डॉ. संजीव राय यांचे याबाबत दिलेले मत हे खालील लिंक वर उपलब्ध आहेत.


Link:  https://epaper.navbharattimes.com/imageview_37204_24504_4_16_12-06-2021_6_i_1_sf.html


5. भारतात करण्यात आलेल्या ‘सीरो सर्व्हे’ नुसार अशी व्हॅक्सीन पेक्षा जास्त प्रभावी प्रतिकारशक्ती असलेले एकूण 90% + च्या जवळपास नागरिक आहेत. ती संख्या वाढत आहे.


6. त्यामुळे अश्या लोकांना कोरोना निर्बंधांपासून सर्वात आधी सूट मिळणे आवश्यक आहे व त्यामुळे सामान्य जन-जीवन लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. परंतू तसे केल्यास व्हॅक्सीन कंपन्यांचे लाखो कोटींचे नुकसान होण्याची शक्यता. असल्यामुळे व्हॅक्सीन निर्माता कंपन्यांच्या माफियांनी साकारमधील भ्रष्ट नेते व अधिकारी यांना हजारो कोटींची लाच देवून केवळ लस घेणाऱ्यांनाच लोकल ट्रेन मध्ये प्रवास तसेच ऑफिसमधील कर्मचारी हॉटेल व इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे लसीकरण केले असले पाहिजे असे बेकायदेशीर निर्बंध लावणे सुरु केले. तसेच शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा सपाटा चालविला.


7. ज्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिले आहेत तो सुरक्षित नसून त्याला कोरोना होऊ शकतो, तो कोरोना रोगाचा संसर्ग पसरवू शकतो व त्याचा मृत्यू सुद्धा करोनमुळे होऊ शकतो. करीता त्याने लस न घेतलेल्यांप्रमाणेच कोरोनाचे सर्व निर्बंध पाळावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले असून त्या कारणामुळे लस घेतलेल्या लोकांना कोणतीही विशेष सवलत देता येणार नाही. असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.


8. असे कोरोनांचे दोन्ही डोज घेतलेल्या अनेकांचे मृत्यू कोरांनांमुळे झाले आहेत. त्याबाबत सर्व माहिती Google वर, सरकारकडे व ‘अवेकन इंडिया मुव्हमेंट’ च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.


9. इंडियन मेडिकल असोसिएशन चे पूर्व अध्यक्ष के. के. अग्रवाल व दिल्लीतील 60 डॉक्टर्स ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांच्या मृत्यू कोरोनानेच झाला होता.


लिंक: (i) https://www.ndtv.com/india-news/dr-kk-aggarwal-ex-chief-of-india-medical-association-ima-dies-of-covid-19-coronavirus-2443827


(ii) https://theprint.in/health/at-least-60-delhi-doctors-have-died-in-2nd-covid-wave-families-are-left-to-pick-up-pieces/661353/


ठाणे येथील 75 डॉक्टर्स चा मृत्यू कोरोनाने झाल्याची बातमी दि. 1 जुलै 2021 रोजी दै. लोकमत मध्ये प्रकाशित झाली होती.


लिंक: https://drive.google.com/file/d/1eZGQoHzzl4pUShRYt7U0YZ82zvJ4UYEn/view?usp=sharing


10. असे असतांना त्याच ‘अप्रभावी’ लसीचे गुण-दोष लपवून केवळ लस हाच उपाय असल्याचे भासवून जनतेची फसवणूक करून जनतेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या दबाव टाकून त्यांना लस घेण्यास भाग पाडून त्यांचा जीव धोक्यात टाकून लस निर्माता कंपनीला हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी सर्व आरोपी अधिकारी व राजकीय नेते यांच्याविरुद्ध भादंवि 52, 420, 304, 302, 115, 409, 471, 474, 511 r/w 120(B), 34 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम 51, 52, 53, 54, 55, 56 व कायदयातील इतर तरतुदींअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.


11. वरील सर्व निर्देश हे बेकायदेशीर व घटनाबाह्य असून असे अनेक निर्देश मा. उच्च न्यायालयांनी वेळोवेळी खारीज करून रद्दबादल ठरविले आहेत. भारताच्या केंद्र सरकारने सुद्धा लस घेणे ऐच्छिक असून लस घेण्यासाठी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणता येणार नसल्याचे व लस घेतली नाही म्हणून कोणत्याही सुविधा रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


12. महाराष्ट्र्रात नागरिकांचे हित सोडून स्वतःचे हित जपणारे बेकायदेशीर आदेश, निर्देश देणारे संबंधीत सर्व अधिकारी व मंत्र्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याकरीता दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.


दुसरी याचिका ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ चे श्री योहान टेंगरा यांनी दाखल केली आहे. याचिकेची प्रत:


Link:- https://drive.google.com/file/d/1E6eyO6mi-tV25IhkbEN8SUDvxpANatXL/view


'अवेकन इंडिया मुव्हमेंट' चे फिरोज मिठीबोरवाला यांनी ती याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेमध्ये बेकायदेशीर आदेश पारीत करणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अप्पर सचिव श्रीरंग घोलप, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना उत्तरवादी बनविण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


याचिकेची प्रत:-

लिंक:- https://drive.google.com/file/d/1faalsVdH7Ff2j7o8p3IN_eDJDIs2JO-b/view?usp=sharing


भ्रष्टाचाराची व्याप्ती लाखो कोटींमध्ये:-


13. भारतात एकूण १३५ कोटी लोक राहतात. सध्या एका व्यक्तीस लसींचे दोन डोज घेण्यासंबंधी सूचना आहेत. जर १०० कोटी पात्र लोक धरले तर जवळपास २०० कोटी लसींचे डोज विकले जाणार. त्यानंतर लोकांना भीती दाखवून बुस्टर डोज व इतर अनेक युक्त्या करुन लाखो कोटी रुपये कमविण्याच्या व जनतेला नेहमीच वेगवेगळी निर्बंध लादून गुलामीत ठेवण्यासाठी या भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांनी प्लॅन करुन ठेवले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्या देशद्रोहींनी सरकारकडे लसींचा साठा उपलब्ध नसतांना त्वरीत लस घेण्याचे नियम आणले. त्यामागे त्यांचा उद्देश होतो की लोकांना लस घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात पळावे लागेल व तिथे काळाबाजार होईल व त्यांना अधिक फायदा होईल. मुंबई, पनवेल भागात कित्येकांना एक लस १००० ते ३००० रुपयांपर्यंत विकत घ्यावी लागल्याची माहीती आहे.


14. जर खाजगी रुग्णालयात लसीची किंमत १००० रुपये जरी धरली आणी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी लस कंपन्यांच्या फायद्यासाठी लसींचे बुस्टर डोज वैगेरे वाढविणे सुरु केले तर प्रत्येक डोज चे आदेश हे लस कंपन्यांना व खाजगी रुग्णालयांना जवळपास १ लाख कोटी रुपयांचा अवैध व्यवसाय व पर्यायी लाभ करुन देणारे ठरतात त्यापैकी काही हजार कोटी रुपयांची लाच ही संबंधीत मंत्री, अधिकारी, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, डॉक्टर्स आदी लोकांना दिली जाते आणी ते सर्व लोक कसेही करुन लस घेण्यासाठी लोकांवर दबाब आणतात.


15. त्याकरीता त्यांच्या कटात सामील AIIMS चे डॉ. रणदीप गुलेरीया सारख्या डॉक्टरांना लसींची खोटी जाहीरात करण्याकरीता यु-ट्यूब वर बोलाविले जाते व तो खोटी जाहिरात करतों की 'लस पूर्णतः सुरक्षित आहे'. लोकांना लसीचे दुष्परीणाम सांगीतले जात नाही. परंतु व्हॅक्सीन कंपन्यांनी कितीही मार्केटींग केली तरीही लोक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे कळल्यानंतर रातोरात बोगस नियम बनवून व निर्बंध घालून जनतेला लस घेण्यास बाध्य केले जात आहे. व्हॅक्सिन कंपन्यांच्या फायद्यासाठी जनतेचा जनतेचा जीव धोक्यात घातला जातो. यावरुन त्यांनी नैतीकतेची नीच पातळी गाठली असल्याचे स्पष्ट होते.


16. भ्रष्ट मंत्री व सरकारच्या दडपशाहीमुळे लस घेणाऱ्या नागरिकांना लसीच्या दुष्परीणामांमुळे जीवघेणे त्रास होतात कित्येक लोकांचे मृत्यु होतात. कोणाला अंधाळेपणा, बहिरेपणा येतो, पक्षघात, लुळेपणा येतो. ११ यूरोपीय देशांमध्ये भारतातल्या 'कोव्हीशील्ड अॅस्ट्राझेनीका' या लसीला बंदी घातली जाते कारण त्या लसीमुळे रक्तांच्या गुठळ्या होवून लोकांचे मृत्यू झाले होते.


17. भारतात अपोलो हॉस्पीटल सारखे भ्रष्ट हॉस्पीटल हे व्हॅक्सीन कंपनीसोबत मिळून खोटे स्लोगन तयार करतात की "No one is safe unless everyone is Vaccinated." आणि भ्रष्ट मंत्री व अधिकारी मूग गिळून गप्प बसतात. खोट्या जाहिरातीसाठी त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक असतांना ती कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते.  शेवटी जागरुक नागरीक डॉक्टर्स, वकिल व संघटना पुढे येवून भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांना न्यायालयात खेचतात.


18. अपोलो हॉस्पीटलाविरुद्ध पण विविध संघटनांकडून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरु असून लवकरच त्यांना न्यायालयात खेचले जाणार आहे.


19. व्हॅक्सीन माफियाच्या विरोधात संपूर्ण जगभर आंदोलन होत असून 'अमेरिकन फ्रंटलाईन डॉक्टर्स' यांच्या तर्फे अमेरिकेतील न्यायालयात याचिका दाखल करुन लसीकरण त्वरित थांबविणे आणि सरकारने लाकडाऊन व इतर निर्बंध हे औषधी कंपनीचा गैरफायदा करण्याकरीता लावण्यात आले होते असे जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.


लिंक:  

https://drive.google.com/file/d/1GTfKrq0eZS5dcUtkZXEgq3KABRytCNRk/view?usp=sharing


20. जागतिक आरोग्य संघटना World Health Organization (WHO) च्या अधिकाऱ्यांनी सदर कोरोना घोटाळा Corona Scandal/Scam मध्ये आरोपींना मदत केल्याप्रकरणीच्या पुराव्यासहित एक सविस्तर तक्रार मानव अधिकार सुरक्षा परिषदेचे महासचिव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना दि. 30 जून 2021 रोजी पाठविली आहे. त्यामध्ये व्हॅक्सीन माफिया बिल गेट्स, एम्स चे डॉ. रणदीप गुलेरीया, WHO च्या डॉ. सौम्या स्वामिनाथन, युट्यूब, गुगल, ट्वीटर व काही मिडीयातील लोक यांनी कट रचून लाखो लोकांचे खून (Mass Murder) व जनसंहार (Genocide) केल्याचे संपूर्ण पुरावे तसेच भारत सरकारच्या संसदीय समिती चा चौकशी अहवाल देवून दोषींविरुद्ध भादवि 302, 115, 304, 109, 409, r/w 120(B) आदी कलमांअंतर्गत फौजदारी कारवाईची मागणी केली.


लिंक:- (i) https://rashidkhanpathan.blogspot.com/2021/07/corona-frauds-secretary-general-of.html


(ii) https://greatgameindia.com/bill-gates-path-tribal-girls-india/


21. भारताच्या मानव अधिकार सुरक्षा परिषदेच्या त्या तक्रारीची दखल संपूर्ण जगभरात घेतली गेली असून त्याबाबत फ्रांस, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आदी देशांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. France Soir मध्ये ती बातमी ठळकरीत्या प्रकाशीत करण्यात आली आहे.


लिंक:- https://www.francesoir.fr/societe-sante/plainte-oms-india-peine-de-mort


22. इतर प्रभावी उपचार: आयव्हरमेक्टीन, व्हिटामीन डी, नॅचरोपॅथी:-


22.1. कोरोना रुग्णास "आयवरमेक्टीनची" (Ivermectin) गोळी दिल्यास रुग्णास पुर्ण आराम मिळतो रोगी पुर्ण बरा होतो, त्याचा मृत्यू होत नाही. त्याचा जीव जात नाही व त्या औषधाचे कोणतेही घातक दुष्परिणाम नाहीत असा निष्कर्ष देशातील विविध राज्यांच्या विशेषज्ञ समिती व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अमेरिका, ब्रिटेन, मधील संस्था FLCC, BIRD यांच्या लाखो लोकांवरील निष्कर्ष चाचणीचे अहवाल उपलब्ध आहेत.


22.2. नुकतेच ‘मुंबई उच्च न्यायालयाने’ 28 मे 2021 रोजी ‘गोवा सरकारच्या’ बाजूने निकाल देत इवरमेक्टीन चा वापर करण्यास परवानगी दिली आहे. [PIL WP NO. 1172 OF 2021 South Goa Advocates Association & Ors. Vs. State of Goa]


22.3. आयवरमेक्टीनची (Ivermectin) गोळी कोणत्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये स्वस्त दरात अंदाजे 30 रुपयात उपलब्ध आहे. त्याचा कुठेही तुटवडा नाही.


22.4. आयवरमेक्टीनच्या गोळी घेतल्याने शेवटच्या स्टेजचा कोरोना आजार सुद्धा पूर्णपणे बरा होवून लोकांचे जीव वाचविण्याची त्या गोळीची क्षमता जगभरात सिद्ध झाली असून व्हेंटिलेटरवर असलेल्या ८८ वर्षीय वृद्ध महिलेस सुद्धा 'आयवरमेक्टीन' (Ivermectin) या गोळीच्या उपचाराने वाचविल्याचे पुरावे व अमेरिकेच्या न्यायालयाचे आदेश इंडियन बार असोसिएशनच्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत:-


(i) www.indianbarassociation.in


(ii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2103


(iii) https://indianbarassociation.co.in/?page_id=2097


२२.५. आयव्हरमेक्टिन, व्हिटॅमिन डी, आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, होमीयोपॅथीक आदी व्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी व दुष्परिणाम विरहीत उपचारामुळे व्हॅक्सिन कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा होत असल्यामुळे आरोपींनी कट रचून त्या औषधांची परिणामकारकता लोकांपुढे येवू नये याकरिता यु-ट्यूब, ट्विटर, फेसबुक  अश्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा करण्यास बंदी घातली व कसेही करून व्हॅक्सिन हाच कोरोनावर प्रभावी उपाय आहे हे दाखविण्याच्या खोटा प्रयत्न केला.  आयव्हरमेक्टिन हे औषध कित्येक वर्षांपासून सर्वात सुरक्षित औषध म्हणून जागतिक आरोग्य संघठन (WHO) च्या लिस्ट मध्ये आहे. तसेच आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी द्वारे कोरोनाचे लाखो रुग्ण बरे झाल्याचे पुरावे उपलब्ध असतांना त्याला विचारात न घेता केवळ चार महिन्यात तयार केलेल्या व ज्यांची परिणामकारता सिद्ध न झालेल्या व्हॅक्सिनला  पुढे आणण्याकरिता हजारो कोटींचा भ्रष्ठाचार करण्यात आला व व्हॅक्सिनचे  जीवघेणे दुष्परिणाम लपवून त्याचाच प्रचार करण्यात आला व नागरिकांना लस घेण्यास बाध्य करण्यात आले.


22.6. अश्याप्रकारे आयवरमेक्टीनला बाजूला ठेवून लस (Vaccine) चाच आग्रह धरुन कित्येक नागरिकांचे जीव धोक्यात घालून त्यांना महागडे व घातक दुष्परिणाम असलेले औषध देणे हा औषध कंपनीचे माफियांकडून सरकारी यंत्रणेचा केलेला गैरवापर व नागरिकांची चालविलेली फसवणूक असल्याचे सिद्ध झाले आहे.


22.7. नुकतेच काही औषध व लस निर्माता कंपनीच्या माफिया यांनी [वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)] जागतिक आरोग्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मुख्य सायंटीस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मार्फत आयवरमेक्टीन संदर्भात चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला.


22.8. परंतु इंडियन बार असोसिएशनने तिला ५१ पानी कायदेशीर नोटीस देऊन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना प्रत्येक नागरिकांच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरून तिच्याविरुद्ध भादवि ३०२, ३०४, १८८, १२०(ब), ३४ अंतर्गत कारवाईचा ईशारा दिला. नोटीस मिळताच WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन ने घाबरून जावून इवरमेक्टीन चा विरोध करणारे 'ट्वीट' डीलीट करून टाकले.


22.9. इंडियन बार अससोसिएशनच्या प्रयासाने WHO च्या अधिकाऱ्यांचा भ्रस्टाचार  खोटेपणा व जनतेला मुर्ख बनवून त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या व उदरनिर्वाहाच्या रोजगारा वर गदा आणून त्यांना गरीब बनविण्याच्या प्रकार उघडकीस आला.


इंडियन बार असोसिएशनच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण जगभरात होत असून नोटीस पाठविणाऱ्या अॅड. दीपाली ओझा यांची मुलाखत अमेरीका, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका अश्या जगभरातील विविध प्रसार माध्यमांनी घेवून प्रकाशीत व प्रसारीत केल्या आहेत.


लिंक:-


1. https://www.francesoir.fr/politique-monde/livermectine-utilisee-en-inde-avec-succes-confirmee-comme-traitement-contre-la-covid


2. https://youtu.be/brlZ_77uqn8


3. https://www.bitchute.com/video/62kUVBYFAliV/


23. आयुष मंत्रालयाचे National Institute of Naturopathy Pune यांनी डॉ. बिश्वरुप चौधरी यांनी दिलेल्या नॅचरोपॅथीची उपचार पद्धती व त्यांचे अहमदनगर येथील उपचार केंद्रावर भेट देवून ही कोरोना वर १०० टक्के प्रभावी असून कोणतेही दुष्परीणाम न होता तसेच कोणतेही बंधने न पाळता सुद्धा कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा अहवाल सादर केला असून कोरोना बरा करण्याकरीता त्या पद्धतीचा वापर कोरोना बरा करण्याकरीता करण्यासाठी प्रभावी शिफारस केली आहे.


24. डॉ. बिस्वरुप चौधरी यांच्या उपायामध्ये फक्त फळांचा रस व Fluid Diet च्या माध्यमातून लाखो कोरोना रुग्ण घरीच बरे झाल्याचे पुरावे आहेत. त्यांना मास्क किंवा सोशल डिस्टंसींग वॅगेरे कोणतेही निर्बंध नव्हते.


25. जागतिक आरोग्य संघटना व शासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील वरील सर्व भ्रष्टाचारांची योग्य ती चौकशी झाल्यास लवकरच आरोपींना शिक्षा होऊन नागरिकांचे जीवन पूर्ववत येईल अशी अपेक्षा सर्व स्तरांवरुन नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 


26. जनते कडून अश्या भ्रष्ट व अनैतिक नेत्यांना, अधिकाऱ्यांना व डॉक्टराना त्वरित अटक करण्यासाठी देशभरात आंदोलने होणार असून जनतेने या देशहित कार्यात पुढे येवून सहकार्य करावे व सर्वांपर्यंत हा निरोप पोहचवून जनजागृती करून आरोपींचे पुढील प्लॅन हाणून पाडावे. आपल्या मुलांना प्रायोगिक लस देण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे आवाहन “इंडियन बार असोसिएशन”, अव्हेकन इंडिया मूव्हमेंट, मानव अधिकार सुरक्षा परिषद, साहसिक संघटना, फेडरेशन ऑफ इलेक्ट्रोनिक व प्रिंट मीडिया अगेंस्ट कोरोना स्कँडल, ऑल इंडिया एस. एस. टी अँड मायनॉरिटी लोयर्स असोसिएशन, ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ ज्युरीस्टस फॉर ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन’ आदी विविध संघटनांनी केली आहे.


27. भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मूर्खांसारखे काही नियम – RT-PCR test दर १४ दिवसांनी करण्याचे आदेश.


वरील आदेशाला काहीही अर्थ नाही किंवा वैज्ञानिक आधार नाही कारण ज्या व्यक्तीने RT-PCR test केली असेल, त्या व्यक्तीला अर्ध्या तासात, एका दिवसात कधीही कोरोना होवू शकतो. एकदा RT-PCR test केली म्हणजे त्याला पुढच्या १४ दिवसात कोरोना होत नाही असा काही नियम नाही. हा केवळ मूर्खपणाचा कळस आहे. तरी सुद्धा RT-PCR test बनवणाऱ्या कंपन्या आणि टेस्ट करणाऱ्या प्रयोगशाळा यांचा हजारो कोटींचा गैरफायदा करण्याकरीता आणि जनतेचे दैनिक जीवन विस्कळीत करुन, त्यांना अधिक गरीब बनविण्याकरीता कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. जनता अधिक गरीब होवून नेहमी निर्बंधात गुलाम म्हणून राहावी अश्या दुष्ट हेतूने असे वेगवेगळे चुकीचे नियम बनविल्याचे दिसून येते.


28. मास्कचे चुकीचे नियम:-


28.1. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या दि. 27 मे 2021 च्या आदेशानुसार मास्क लावणे बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे व निरोगी लोकांना मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत कळविले आहे.


लिंक: https://drive.google.com/file/d/10f35twtB2sUl_-RWtb2vgsJK70YGAPfP/view?usp=sharing


मग असा प्रश्न उपस्थित होतो की मुंबई महापालिकेने मास्क न लावण्याच्या कारणावरुन नागरिकांना वेठीस धरुन ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड कसा वसूल केला?


28.2. मास्कमुळे कोरोनांच्या विषाणूंपासून बचाव होतो असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.


खुद्द भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना हा विषाणू चांगल्या मास्क च्या छिद्राच्या शेकडो पटीने लहान असून तो सहज पणे मास्कमधून जावू शकतो.


28.3. मास्क लावण्याचे कोणतेही सकारात्मक परीणाम समोर आले नसून मास्क लावून, सर्व निर्बंध पाळून, सर्वात जास्त लोकांना व्हक्सीन देणाऱ्या केरळ राज्यात कोरोना रुग्णांची ही देशात सर्वाधीक जास्त प्रमाणात आहे. व ती रोज वाढत आहे.


28.4. मास्क चा वापर केवळ रुग्णांना भेटण्यासाठी जातांना करणे अपेक्षीत असून आठ तासापेक्षा जास्त मास्क घालू नये असे उत्तर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिले आहे.


28.5. मास्क लावल्यामुळे तुम्ही नाकाद्वारे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू परत घेतात त्यामुळे तुमच्या शरीराला ऑक्सीजन कमी मिळतो. त्यामुळे फुफ्फुसे (Lungs) निकामी होण्याची व विविध गंभीर आजार जडण्याची शक्यता असते.


28.6. दुसऱ्या लाटेत अनेकांना अधिक ऑक्सीजनची आवश्यकता भासली होती त्यामागचे कारण मास्कचा अत्याधिक वापरही असू शकते. असे तज्ञांचे मत आहे. 


28.7. तरीसुद्धा शासनाने नागरिकांना मास्क लावण्याचे बंधन घालून नागरिकांकडून कोट्यावधींचा दंड वसूल करून नागरिकांवर अत्याचाराची सीमा गाठली आहे.


 त्यावरून त्यांच्या उद्देश्य जनतेच्या हिताचे रक्षण करणे नसून स्वतःचा गैरफायदा करून घेणे आहे असे स्पष्ट होते.


29. सरकारचे फक्त एकच ध्येय दिसते ते म्हणजे कसे ही करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांना दहशतींमध्ये ठेवून औषध व व्हॅक्सीन विक्रेत्या कंपन्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे धोरण राबविणे हे होय. त्याकरिता संबंधीत मंत्री व अधिकाऱ्यांना हजारो कोटींची लाच देण्यात आली आहे .


 नागरिकांनी वेळीच जागरूक होणे गरजेचे असून या अन्यायाविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही आणि तुमची येणारी पिढी वाचणार नाही वाचलेली लुळी पांगळी गरीब व गुलाम म्हणून जगण्यास बाध्य राहील.


30. अधिक माहितीसाठी ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ व ‘इंडियन बार अससोसिएशनच्या’ वेबसाईट वर बघावे.


Link:


1.     www.indianbarasso ciation.inbe


2.     www.awakenindiamovement.com